फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

वाट पाहत कुणीतरी 
म्हणूनच जाण्यात मजा आहे
ऐकत असत कुणीतरी 
म्हणूनच गाण्यात मजा आहे
जुनीच पत्र पुन्हा पुन्हा 
वाचत असत कुणीतरी
दिवे सगळे विझल्यावर
जळत असत कुणीतरी
त्याच खिडकीत चंद्र होऊन
टपटपण्यात मजा आहे
स्वप्नात येत कुणीतरी 
म्हणूनच झोपण्यात मजा आहे
ऐकत असत कुणीतरी 
म्हणूनच गाण्यात मजा आहे
हरवु नकोस मनाला आता 
शपथ मानाने घातली आहे
भरवू नकोस अश्रूंनी डोळे 
शपथ पाण्याने घातली आहे
साथ दे अशीच आयुष्यभर 
शपथ स्पंदनाने घातली आहे 
हे जगणेही तुझ्याच नवे आता,
कारण शपथ बंधनाने घातली आहे

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

एक विनंती आहे ....

एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवलच येऊ नका,
busy आहे सांगुन टालायाच असेल
तर वेळच देऊ नका......



एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........


एक विनंती आहे .....
चौकशी भरे call कालजीवाहू sms यांचा
कंतालाच येणार असेल तर misscall च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका.......


एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
सीक्रेट्स share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका.....


एक विनंती आहे .....
माझ्या कालजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका ,
अनोलखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जानुच नका ....


एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....


एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ........!

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

यालाच म्हणतात का प्रेम....?

"यालाच म्हणतात का प्रेम....?

तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेच खुलनारी प्रत्येक दिशा,

यालाच म्हणतात का प्रेम....?


तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,

यालाच म्हणतात का प्रेम....?


तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मला प्रत्येक क्षणी होणारा भास,

यालाच म्हणतात का प्रेम....?


तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,

यालाच म्हणतात का प्रेम....?


तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचा झालेला तिला स्पर्श,
आणि हे सर्व वाचून,
तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचा वेड्या अक्षयला झालेला हर्ष,

कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!"
"तीच प्रेम लहरी,
न सांगताच रुसनार.

माझ प्रेम मात्र निरागस,
तिच्या गालावरचा एक एक अश्रु पुसणार.


तीच प्रेम हट्टी,
वाट्टेल तस वागणार.

माझ प्रेम मात्र सोशिक,
तिची चुक असुनही मान ख़ाली घालून माफ़ी मागणार.


तीच प्रेम भित्र,
कायम दुरून मजा पाहणार.

माझ प्रेम मात्र निर्भिड,
आख्या जगाच्या विरोधात तिच्या पाठी उभ रहाणार.


तीच प्रेम हुशार,
पावसामधे स्वतः साठी आडोसा बघून वाकणार,

माझ प्रेम मात्र वेड,
तिला उन लागु नये म्हणून दोन्ही हातानी सारा आसमंत झाकणार.


तीच प्रेम स्वार्थी,
माझ्यापासून दूर जाण्यासाठी भांडणार,

आणि माझ प्रेम हिरमुसलेल,
तिने मोड्लेला डाव पुन्हा पुन्हा मांडणार....!"

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय

डोळ्यात पाणी असून ही
त्यांना ही कसं पारतंत्र आलय
आपला गुन्हा नसताना ही 
नावाला बट्टा लागल्यागत झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय

आपलं माणूस आपलं माणूस
म्हणून ज्यांना जीव लावला
त्यना आपली साथ सोडताना
काहीच कसं वाटना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय

काय येवडं चुकलं होतं
म्हणून आज भोगायला आलय
वाटत भांड भांड भांडावं
पण कुणाशी हेच समजणा झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय

वाटतं आपण ही जगावं
दुसर्यान्ग्त हे माझं ते माझं करत
तसं वागायला गेला की
ते ही जमना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
आभाळ फाटल्यागत झालय ......................

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

किती सोप्प असतं ना

किती सोप असत, एखाद्याला फिरवण,
breakup च मनात ठेऊनच त्याच्याशी गोड गोड बोलन,

गरज वाटेल तेव्हा त्याला सोनू , जानू म्हणण,
आणि दुसरा waiting मध्ये आला कि ह्याला कटवण,

जेवढ avoid करता येईल तेवढ करण ,
सहज खोटी आश्वासने देण,

खोटी स्वप्नांची दुनिया दाखवण
आपले काम झाले कि स्वप्ने सारी तोडून जाण

खोट्या वचनांना सहजरीत्या खरे दाखवण
फायदा आपला झाला कि वचने सारी झटक्यात विसरणं...


किती सोप्प असतं ना ह्या मुलींसाठी ?????

आठवणी

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .......

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

तुझ अस वागण...

कळून चुकल तुझ्या मनातील सर्व काही,
कळून चुकल तुला माझी काळजीच नाही ,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही,
पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,
पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,
तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही,
का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही?