फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०


आधार
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

तू माझी
 
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस

आपले
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

तुझे नाव
आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते

प्रेमळ हाथ
डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी
पापण्या मिटाव्या लागतात
ते अश्रु टीपण्या साठी
प्रेमळ हाथच असावे लागतात

लाट
सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती

अलगद
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात  बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

तारुण्य
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य

हृदय
तुझे नाव घ्यायला आता मला
माझया ह्रदयाला  विचारव लागतय
बघितलस माझ  हृदय ही आता
अगदी तुझया सारखच वागतय 

वळण
त्या वळणावर मी  तुला
पुन्हा वळून पाहिले
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले

पापनी
तुज्या  डोळ्याना पाहिल्यावर
मला शिंप्ल्यांची आठवण यायची
तुझी पापनीही तुझया डोळ्याना
अगदी मोत्यासारखी जपायची

मिठी
त्या दिवशी ची सर्वे कामे
मी  अलगद केली होती
जाताना मी  मात्र तुला
घट्ट मिठी मारली होती

चुक
तू जेव्हा चुक केलिस
मी  तुला माफ केल
मी  जेव्हा चुक केली
तू म्हणालिस पाप केल
- सागर 

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.......................
‎" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...
त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... 

मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........
अस नात फक्त त्रास देत......
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका.........
कारण ते हृदयात बसलेले असते "
हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला 


संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..