फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११


माझ्याकडे पाहात जेंव्हा
शांत निघून जातेस,
अश्रू भरल्या डोळ्यानीच
सर्व सांगून जातेस,
माझ्या प्रेमाची उणीव तुला
...सतत भासवत राहील
काही क्षण का होईना पण
माझी आठवण येत राहील,
माझ सोड काही नाही
तू स्वताला जपत जा
रोज रात्री स्वप्नात मात्र
एकदा तरी येत जा,
मी आता जगतोय खरा पण
फक्त खोट्या आशेवर
तू येशील म्हणून आणखीन हि उभा आहे
तुझ्या त्याच परतीच्या वाटेवर ...........

बुधवार, २७ एप्रिल, २०११


तु परत येऊ नकोस..
जुन्या आठवणी जागवायला,

आधीच खुप दिवस लागलेत..
मनावरील जखमा भरायला.

तू निघून गेल्याच दुख नाही
तुझ्यावर प्रेम केल्याच सुख आहे
तुझ्याविना जगण असह्य आहे
परंतु इतरांसाठी जगण कर्तव्य आहे

खूप काही सांगायचं होत तुला पण,
मनातलं मनातच राहून गेल.
सुखाच घरट बांधण्या आधीच
पाखरू रानातल उडून गेल.......!!!

सोमवार, २५ एप्रिल, २०११


मलाही वाटायचं...
मलाही वाटायचं...तुझ माझ्यावर खुप प्रेम असावं.
तुझ्या डोळ्यात ते मला दिसावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर खूप काही बोलावं..
मग खूप वेळ बोलून थोडा वेळ शांत राहावं
मलाही वाटायचं...
तू मला जवळ घ्यावं,
मिठी मारून मला घट्ट धरावं.,
मलाही वाटायचं...
तुझ्या मिठीत मी सर्व विसरावं आणि,
फक्त तुलाच आठवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर खूप भांडावं..
मग भांडण मिटवून, परत गोड व्हावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या सुखात शामिल होवून जावं.. मग
तुझ्यापेक्षाही तुला खूप सुखं द्यावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या दुःखात तुझ्याबरोबर रडावं.. मग
ते माझ्यावर घेवून परत तुला हसवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर एकत्र बसून जेवावं..आणि,
जेवण माझ्या हाताने तुला भरवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या सोबत माझ नाव जोडलं जावं..आणि,
ते नाव सर्वांनी एकत्र घ्यावं..
मलाही वाटायचं...
तुझा हात पकडून घरी सोडायला जावं,
तू गेलीस कि तोच हात घेवून मी परत मागे यावं
मलाही वाटायचं...
आजही मी तुझ्यावर येवून अडतो,
तुझ्या आठवणीनी रडू आल कि अश्रू अडवून धरतो,..
तोल सुटला कि स्वताला सावरण्याचा प्रयन्त करतो,
तू तर जीव घेवून निघून गेलीस,
पण आजही जीव जावून रोज आसचं जगण्याचा प्रयन्त करतो.....

सोमवार, ११ एप्रिल, २०११

कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
 
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी  हा जन्म तुझ्यासाठीच घेतला  असे म्हणनारी,तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,

ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....

मुंग्यांच मुंग्या सगळीकडे झाल्या
नजर उचलून समोर पाहीलं 

रस्त्याच्या कडेला
एक प्रेत पडलेलं..
कुण्या मजनूचं..
साचून राहीलेल्या
अव्यक्त कवितांचं..

तरी कितीदा 
सांगितलं होतं
नकोस लिहू जीवघेणं
काळजाला घरं पडणारं.
नकोस लिहू इतकं जहरी
क्षणोक्षणी डसणारं..

शेवटी व्हायचं तेच झालं
लेखणीचा स्पर्श झाला
आणि आभाळ फाटलं..

आता या पावसात..

ओलेसे शब्द, डोळ्यांतलं पाणी
आणि छिन्नविढिन्न मन 
कसं जळणार............ 
ती हसरं टपोरं गुलाब ,
जितकं नजरेत साठवावं ,
तितक अपूर थोड फार ...!!

ती पावसाची चाहूल देत ,
बेधुंद वाऱ्यावर नाचणारी मोर ,
लाजरी तरी बेभान वेडी पोर ...!!

ती पौर्णिमेचा पुर्णगोल चंद्र ,
असले हजारो डाग त्यावरी तरी ,
अस्सल सौंदर्य त्यातच दडलेलं ...!!