फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

राञीनंतर उगवते, म्हणुन ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणुन ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते,म्हणुन ते आकाश असते!
आसवांनी जोडले जाते,म्हणुन ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,म्हणुन ती मैत्रीअसते!!"
"

"

"

तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,
हे तर माझं फक्त एक काव्य आहे….
खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,
मरणानंतरही जगायचं आहे…

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

भेटूया का?..

भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..

नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी

भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..

घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात

भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..

सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

मी स्वतः तुझ्यावर केलेली लास्ट कविता

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..

एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..


कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..


पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...

शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!


आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?

कदाचित हो असेल तुझ उत्तर...

पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..


होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..

पण वेळ गेल्यावर काय करणार..

त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!


आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..

पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि

कि

कि

तू खुश तर आहेस ना!!

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

एक ज्योत वातीला नेहमी साथ करणारी 
जीवात जीव असेपर्यंत साथ कधी न सोडणारी 
पण अचानक एक वादळ आल आणि-
पणती धक्यावरून खाली कोसळली 
पणतीचे त्या तुकडे झाले 
ज्योत तर वातीला केव्हाच सोडून गेली 
पण त्या उध्वस्त तुकड्यांमध्ये 
वांत अजूनही वाट पहात होती 
पुन्हा एकदा ज्योत त्याच्याजवळ येईल म्हणून 
जमिनीवर सांडलेल्या तेलाने स्वताला चिंब 
भिजवून घेत होती.

प्रेम म्हणजे काय ?


प्रेम म्हणजे काय?
प्रेम कसं होत?
कोणी उत्तर देईल का,
 
प्रेमाची भाषा काय असतं
प्रेम हे डोळ्याने सुरवात होऊन 
 ते हृद्यापर्यात पोचते ते प्रेम का?
 
प्रेम हे काय असतं,
जे आपण आई-वडिलावर करतो ते,
की जीवनाच्या वाटेवर आपल्याला
एका स्वप्नाच्या दुनियामाधला एक सोबतीवरच ते प्रेम का,
 
प्रेम म्हणजे काय?
कोणी सागू शकत का?
प्रेम हे फुलाच्या पाकळ्याप्रमाणे असते ते प्रेम का,
प्रेम हेकमळाचे  चिखलावर असते ते प्रेम का,
प्रेम हे मधमाशी चे फुलाच्या मधावर असते ते प्रेम का?
प्रेम हे युगाप्रमाणे चालत आल ते प्रेम का?
कोणी सागू शकत का?
 

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

फक्त तुझ्यासाठी.....

आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी 

सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....

सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

कुणीतरी लागतं

कुणीतरी लागतं 
आपल्याला वेड म्हणणारं,
वेड म्हणताना आपल्यातलं शहाणपण जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला साथ देणारं, पडत असताना अलगद तोल सावरणारं,
कुणीतरी लागतं आपलेपण जाणणारं,
सुख-दूःखाच्या क्षणांना ह्रदयात साठवणारं, 
कुणीतरी लागतं 
नातं जपणारं, 
नात्यातील अश्रुंची 
किंमत जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला आपलं म्हणणारं, 
दूर राहूनही 
आपलेपण जपणारं......

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

कोणास ठाऊक का ?

कोणास ठाऊक का ?

तुझ्याशी नाही बोलता आलं
तर काही तरी राहून गेल्यासारखा वाटत 
कोणास ठाऊक का ?

भेटतेस जेव्हा मज , हसू उमटते गालावरी 
भेटल्यावर शब्द अपुरे पडतात तरी....
कोणास ठाऊक का ?

रोज ऑनलायीन येऊन ... तुझ्हीच वाट पाहत असतो 
कंटाळलेल्या मनाला विसावा द्यायसाठी तुझी साथ बघत असतो 
कोणास ठाऊक का ?

तुझा चेहरा .. झगमगतो अंतरात.
तुझी ती गोड आठवण .. आणि सोनेरी पायवाट 
कोणास ठाऊक का ?

विरह जरी वाटे इतका कठीण 
हुरहूर असते काळजात, तू भेटशील आजपण 
कोणास ठाऊक का ?

अंतर जरी दोघातले दिसे सूर्याचे चंद्रापासून इतके ..
तुझ्या लक्ख प्रकाश पाहुनी ... रात्र सुद्धा लाजते ...
कोणास ठाऊक का ?

प्रत्यक्षात जरी तुला नाही पाहता आलं तरी 
मनातच तुझी प्रतिमा उमटून येते परी 
कोणास ठाऊक का ?

तुला रोज पाहून हसत असलेला एक फुल जरी दिसे तुला मी 
तरी तुझी चाहूल लागताच ...गंध दरवळू लागतो मी .
कोणास ठाऊक का ?

तुझा स्पर्श झालाच तर . कली उमलते भाग्याची लगेच हि 
आणि तू तोडलेस जरी मला .. तरी हसत हसत प्राणाला मुकेन मी .
कोणास ठाऊक का ?

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

भेट

कसे सांगू तुजला भेटीने तुझ्या
किती आनंद मिळतो माझ्या मनास
सरितेला आलिंगन देताना
होत असेल जेवढा सागरास

मखमली स्पर्श तुझा
अंगावर एक वेगळाच रोमांच फुलवतो
तुझ्या डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहून
मी मात्र खूप सुखावतो

वेळ अतिशय हळू सरावी
हीच बाळगून असतो मनी आस
काही क्षणांनी दूर जाणार आहेस
ही जाणीव मात्र देते त्यावेळी खूप त्रास

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी ठेवत असतो मनात साठवून
नसतेस सोबत तेव्हा मग
झोपतो त्यांनाच उराशी बाळगून

अलिप्त होताना तुझ्याकडे मला
पाहावल ही जात नाही
दुखी असताना हसर्‍या चेहर्‍याने
निरोप देण मला तरी जमत नाही
प्रेम म्हणजे,
दोघाच सुंदर स्वप्न असत,
प्रेम म्हणजे,
तु आणि मी नाहि,
प्रेम म्हणजे "आपण" असत,
प्रेम म्हणजे,
एकाच रुसण तर,
दुसऱ्याच समजावण असत,
प्रेम म्हणजे,
दोन जिव एक असण असत... 

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

माझ्या शितल साठी माझी शेवटची कविता......

सारं आठवतय.......
आपल्या नेहमीच्या बाकावर बसणं
तिथे खांद्यवर डोकं ठेवून एकमेकांत रमून जाणं
"देशील ना मला साथ म्हणून" 
माझ नेहमीचं विचारणं...
तुझे ही मला हसत हसत उत्तर देण..
नाही जाणार सोन्या तुला कधी सोडून...
सारं आठवतय..........

असच सगळं अलबेल चालू असताना..
एकेदिवशी तुझा मला फोन येन,
आणि मला बोलणं, माझा विषय दे सोडून,
नंतर मी तुला शेवटच भेटायला बोलावणं
तुझ ते वागण पाहून सगळं मला समजणं
तरीही मी तुला विचारणं
त्यावर जा मला विसरून असं म्हणून
तुझं ताडकन निघून जाणं
सारं आठवतय.........

तू जात असताना 
तुझा हात रिक्षात मी घट्ट पकडून ठेवण 
माझं तुला डोळे भरून पाहणं
त्या मध्येही डोळ्यात पाणी येणं
तुझं साधं मागे वळूनही न पाहणं
सारं आठवतय
सारं आठवतय................ 

त्याच आठवणी घेऊन मला आता संपूर्ण आयुष्य काढायचंय,
तुझ्या आठवणीत आता मला माझ्या सोबत ठेऊन जगायचं.......

तू तर जीव घेऊन निघून गेलीस...
तरीही आज जीव जळतोय.....
तू परत येण्याची आस आजूनही मनात आहे,
म्हणूनच मी आता जगतोय....

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०१०

ती म्हणायची.........



डोळ्यांत तुझ्या पाहिलं की......
आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी.......
आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!

गालावरची खळी पाहिली की......
हसू थांबावच वाटत नाही.......
खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की.......
तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर......
माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!

तुझी आठवण येणार नाही.......
असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.......
स्वप्न तूटावसच वाटत नाही......

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

प्रेम म्हणजे ( तुझ्यासाठी )

प्रेम म्हणजे रोज रोज एकमेकांना बघणे नव्हे,
प्रेम म्हणजे रोज रोज एकमेकांशी बोलणे नव्हे...

प्रेम म्हणजे एकमेकांपासून दूर राहून एकमेकांच्या आठवणीत दिवस काढणे...

असं प्रेम करावं


थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अगं" चा "अरे" करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

मी संपतो आहे


आज जीवनाच्या एका वळणावर मी उभा आहे
मागे वळता पाहतो तर मी एकटाच आहे

जरा मन बिथरले,कावरे बावरे झाले
माझ्या नजरांना केवळ तीचेच वेध लागले

पण ती शेवटी मला दिसली,ती तीच होती
पण एक गोष्ट मात्र कळली की तिची वाट मात्र आता वेगळी होती

माझ्या डोळ्यांत अश्रू तरारले,
पण तिचे अश्रू ही माझ्या मनात घर करून गेले

मी माझ्या आसवांना आसरा देऊ शकलो
पण तिच्या अश्रूंना नाही पुसू शकलो

मनात आले धावत जावे,तिला मिठीत घ्यावे
आणि तिच्या प्रत्येक अश्रूला हृदयात साठ्वावे

पण मला कळले की मी हाताश् आहे
आणि तिचे जग आता किती वेगळे आहे

तिचे जग वेगळे आहे
कारण ती तुमच्या सारखी सामान्य आहे
आणि मी हे म्हणतोय
कारण मजला आज मृत्यूने वेढले आहे

मी आता तुमच्यात नसणार आहे
पण माझे अस्तित्व तुमच्यात कायमचे राहणार आहे

कारण मी तिच्या हृदयात असणार आहे
तिच्या प्रत्येक आसवांत हसणार आहे

आणि शेवटी ह्या वाटे वर मी एकटाच आहे
तरीही त्यामध्ये एक आगळा आनंद आहे
कारण "मी संपतो आहे"

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

प्रेमात कधी पडू नकोस..


ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

पहिले प्रेम.......


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.


जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला 
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स

अजूनही तू हवीशी वाटतेस


का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

तुझे हात पहिले की ,
कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्ट आतःवत राहतात

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
आणि मग पुढे,मी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....

वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून
रात्रभर बसली असशील
झोपेची वाट बघत,
मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....

कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख
शेवटी काळ हे जालीम औषध असतं
" असल्या " जखमांवर ...
किंवा नसेलही कदाचित .....

का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही ....

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

होता एक वेडा मुलगा


होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा,
अगदी माझ्यासारखा

स्वप्न!!!!


मला जगायच स्वप्नात तुझ्या सोबत,
जे तू स्वप्न दाखवल त्यात बसवायच मनाला.
तू दाखवलेल्या स्वप्न फ़क्त मनराखीचे होते,
कारण त्या स्वप्नात तू कधीच मानाने अलीच नाही.
तू दाखवलेल्या स्वप्नात मला हरावयाच आहे,
त्यातच आयुष्य जगायच आहे. 
तुझ्या दाखवलेल्या स्वप्नातील 
प्रत्येक क्षण साठवण करून
त्याला जोपासयच आहे ,
स्वप्न कस असल तरी त्यात तुझ प्रेम,
तुझा रुसवा फुगवा , तुझा भांडनारा चेहरा आणि 
मला खुप खुप जवळ घेणारा तुझा भाव होता 
अस स्वप्न पाहिल मी तुझ्यात ,
जिथ तू खोटी खोटी का होइना माझी होती 
अन मी एकदम खरा खुरा तुझा ,
तू दाखवलेल्या स्वप्नात एवढा एवढा गुंतलो की,
ते कधी तुटेल अणि चालता श्वास बंद होइल याची कल्पना देखिल कधी करवेना
तरीही सगल्या भावना बाजूला रचून स्वप्न विनायाला घेतल ,
या स्वप्नात आयुष्य काढता येत नाही पण या स्वप्नात माझ सार आयुष्यच व्यापून टाकल.
कधी नवरा-बायको तर कधी आई-बाप 
कधी बाप-लेक तर कधी माय-लेक आसा संवाद 
आयुष्य व्यापेचा साक्षीदारच जणू .
मी तर स्वप्नानाच माझ अस्तित्व बनू लागलोय 
स्वप्नात तू अणि मी असुनही कधी जुलाले नाही 
स्वप्न तुटेल तर नक्कीच श्वास ही तुटेल