फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०


सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेन
जाईन उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल

नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल
त्या आठवांच्या ओल्या दवबिंदुंप्रमाणे
कदाचीत माझे अस्तित्व असेल.... क्षणभंगुर..........
कसे सरतील दिवस तुझे
कश्या सरतील राती....
बावरशील ना ग कदाचीत तु.......
जेंव्हा माझा हात नसेल तुझ्या हाती
पण तरीही
तुला फक्त माझ्यासाठीच जगायचयं
मला हरवणा-या त्या नियतीसोबत
तुला लढायचयं
हसायचयं अन जिंकायचयं...
मी असेनच पाहात तुला
कुठल्याश्या ता-यातुन
करीन तेंव्हाही इच्छा पुर्ण तुझी

त्या आभाळाच्या कोंदणीतुन निखळुन.....

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०


आधार
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

तू माझी
 
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस

आपले
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

तुझे नाव
आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते

प्रेमळ हाथ
डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी
पापण्या मिटाव्या लागतात
ते अश्रु टीपण्या साठी
प्रेमळ हाथच असावे लागतात

लाट
सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती

अलगद
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात  बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

तारुण्य
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य

हृदय
तुझे नाव घ्यायला आता मला
माझया ह्रदयाला  विचारव लागतय
बघितलस माझ  हृदय ही आता
अगदी तुझया सारखच वागतय 

वळण
त्या वळणावर मी  तुला
पुन्हा वळून पाहिले
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले

पापनी
तुज्या  डोळ्याना पाहिल्यावर
मला शिंप्ल्यांची आठवण यायची
तुझी पापनीही तुझया डोळ्याना
अगदी मोत्यासारखी जपायची

मिठी
त्या दिवशी ची सर्वे कामे
मी  अलगद केली होती
जाताना मी  मात्र तुला
घट्ट मिठी मारली होती

चुक
तू जेव्हा चुक केलिस
मी  तुला माफ केल
मी  जेव्हा चुक केली
तू म्हणालिस पाप केल
- सागर 

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.......................
‎" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...
त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... 

मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........
अस नात फक्त त्रास देत......
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका.........
कारण ते हृदयात बसलेले असते "
हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला 


संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मी एकटाच बरा होतो 
तू अचानक आयुष्यात आलीस
काय घडत हे कळण्याआधीच
तू प्रेमाचा रंग भरून गेलीस

कोणातही न मिसळणारा मी
आता, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो
विषय काही नवा नसतो आपल्यात
पण, तुझ्याशी बोलायला वेळ कमी पडतो

छोटीशी गोष्ट अर्ध्यावर राहिलीतर
ती, मला उदयावर ढकलता येत नाही
तुझा फोन जर आला नाही तर
मला रात्रीला नीट झोप लागत नाही

भांडणही करून पाहिलं तुझ्याशी
पण, तुझ्याशिवाय मन करमत नाही
काय अवस्था असते त्या दिवशी माझी
ज्या दिवशी तू माझ्याशी बोलत नाही

मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो
तुझ्या चेहरयावर हसू पाहण्यासाठी धडपडतो
काय नशा तुझी प्रेमाची माझ्यावर
मी, आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो

दे वचन मला तू आज
गोड ओठांच्या चुंबनाची घेत साक्ष
कधी देणार नाही माझ्या प्रेमाला अंतर
आयुष्यभर फक्त माझीच राहशील तू निरंतर 

सोमवार, २७ डिसेंबर, २०१०

तू....


तू आलीस अन्
आयुष्य पुन्हा उभारी घेऊ लागलयं,
मन पुन्हा एकदा
कोणाच्या तरी प्रेमात झुरु लागलयं.....

तुझा तो निरागस चेहरा
डोळ्यासमोरून जाता जात नाही,
तुझा तो कोमल हात हातात घेतल्याशिवाय रहावत नाही.....

तू जवळ नसलीसना की
मन कसतरीच वागू लागतं,
अन् मग तुझ्याच आठवणीत
ते रात-रातभर जागू लागतं.....

आयुष्यभर साथ दे
हे एकच मागणं आहे,
कारण हे आयुष्य आता फक्त
तुझ्यासोबतच जगणं आहे....

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली.

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
क्षणात मी भूतकाळात गेलो
जुन्या आठवणीत मी रमलो
कठीण झाले भावनांना आवरणे
अश्रुनाही मी ना थांबवू शकलो..

सारे काही कालच्यासारखे वाटत होते
रंग आमुच्या प्रेमाचे जेव्हा बहरत होते
होते किती सुखाचे क्षण सारे
डोळ्यासामोरी चित्र उभे राहिले होते...

तिच्या लग्नाची पत्रिका आली..
मानल एक चटका लावूनी गेली
बंद करुनी ठेवल्या होत्या आठवणी
आठवणीना जागे करुनी गेली...

स्पर्श तिच्या प्रेमाचा तो 
अजूनही मी विसरलो नव्हतो,
हातावरील रेषात मी आजही
तिचाच हात शोधत होतो...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
वस्तुस्तिथी आज सारी बदललेली होती
कधी काळी माझ्यावर प्रेम करणारी,
लग्नाच्या बंधनात बंधणार होती...

विरहाचा नियतीला दोष देणे
केव्हाच मी बंद केले होते
गाली हास्य तिचे खिलत राहावे
हेच मागणे देवाकडे केले होते...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
थोड्या दिवसात लग्न तिचे होणार होते
साता जन्मांचे बंध जुळणार होते
दुखाची झळ ही तिच्यापर्यंत जावू नये
साकडे हे देवाकडे मी घातले होते...

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

अशांसाठी ज्यानी या आयुष्यात खरेच कुणावर खुप प्रेम केले आहे पण ते प्रेम त्याना ह्या आयुष्यात मिळू शकले नाही ; अशाच एका खरया प्रेमीचे हे खरे ह्रुद्यास्पर्शी शब्द ....


""लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी."

बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

फक्त मिठीत घे...!!

फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे...
एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभ राहिल्यावर..
फक्त मिठीत घे...
सगळी दुनिया विरोधात असल्यावर..
फक्त मिठीत घे...
जगण्याची लढाई लढताना खुप थकल्यावर..
फक्त मिठीत घे..
जगण्याची इच्छाच मरून गेल्यावर...
फक्त मिठीत घे...
मरणाच्या आधी दोन क्षण...
फक्त मिठीत घे....
फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे..!!!
फक्त मिठीत घे...!!!
दररोज घरी येता जाताना
नजरेत तुलाच शोधायचे ,
आणि कधी तू दिसलीस तर
आपोआप ओठांवर हास्य उमलायचे ,
दिवसभर college असल्यामुळे
तुला फार काळ न्याहाळता येत नव्हतं,
पण जेव्हा केव्हा समोर येशील
तेव्हा नकळत हात तुला hi करण्यासाठी उठायचे,
एके दिवशी बोलता बोलता
मनातल्या feelings बोलून गेलो,
आणि त्यातूनच एक
सुरेख नाते जन्माला आले,
बरेच दिवस झाले
दोघे सुखात होते,
पण अचानक काय झाले माहित नाही
पण तिने बोलणे बंद केले,
तिच्या अशा वागण्याने
त्याने खूप सोसले,
पण मग हळूहळू स्वतःला सावरले ,
 आणि पुन्हा एकदा नव्याने जगणे सुरु केले,
लोकांचा नजरेत आता तो खुश होता,
पण मनात मात्र एकच आस होती,
एकदा ....एकदा तरी परत येशील का माझ्याकडे ,
पुन्हा एकदा अनुभवायला त्याच प्रेमाचे गोडवे. 
मनापासून ती खूप आवडते मला
तिच्या मनातलं, पण माहीत नाही
मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल
तिच्या हृद्याच्या वहीत नाही

श्वासाहून जास्त तिचे विचार येतात

ती विचारांच्या भानगडीत पडत नाही
म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते"
पण विचारांच्या मिठीत सापडत नाही

डोळे तिचचं चित्र रेखाटतात

तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही
दिसतो तिथे अधून मधून तसा
पण काजवा होऊन चमकत नाही

प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते

तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही
समुद्राच्या वाळूत घर बांधायला
अजून तिचं मन तसदी घेत नाही

कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय

ती बुडत असेल पटत नाही
दोघांच्या मनात एकसारखी क्रिया
घडत असेल असं वाटत नाही 

मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०

तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त .

तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त ..
आपल्या पहिल्या भेटीत एक नातं जडलं होतं
आता मला माहित नाही पण तेव्हा तुला माझ्या बद्दल काहीतरी वाटतं होतं
मी ही म्हणून धाडस केलं होतं
आज तेच नातं तोडताना तुझ्या डोळ्यात साधं पाणी ही न्हवत

आपल्या प्रत्येक भेटीत आपण एक नवीन स्वप्नांचं घर बांधलं होतं
आज तीच स्वप्ना उधळताना तुला काहीच वाटत न्हवत
नेहमी भेटल्य्वर घट हाथ धरणारी तू
आज तोच हात सोडताना माझ्या कडे तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ही न्हवत .

नेहमी तासन तास बोलणारी तू
अन " उद्या करशील ना रे फोन " असं बजावणारी तू
आज माझ्याशी कायमचा अबोला धरताना
तुला काहीच कसं वाटत नह्व्त

येवडचा मी जर नकोसा होतो तर
आधी होकार का दिलास
अन एका वाटेवर आपण सुखाने चालत असताना
अर्ध्या वाटेवर माझी साथ सोडताना
तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त .
काहीच कसं वाटत नह्व्त .....

फक्त तुझ्यासाठी.....


आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी 
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी 
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी..... 

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी 
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी..... 

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी 
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी..... 

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी 
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी..... 

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी 
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी 
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी....

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

जाउ कुठे कळेना

जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले
पाहू कुठे कळेना, डोळ्यात दाटलेले

डोंगरांच्या रांगा , कोसळून आल्या
भिंती दहा दिशांच्या ढासळून आल्या
पळण्याआधीच माझे, पाय ताठलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले

जगण्याच्या लढाईत, माझीच हार झाली
मरण्याआधीच आशा, जगण्याची ठार झाली
पळतो तरी भयाने, वाटेत गाठलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले

मागे गिधाडे बसली, चाटीत त्याच्या जिभा
पुढे तरसांचा थवा, दात पाजळीत उभा
कुठे उडून जाउ, पंखही छाटलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….






प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

शेवटची भेट मजसी न कळाली.

शेवटची भेट ती
आज नियतीने लिहिली होती
कर्दनकाळी रात्र ती
आज आली होती ...

लिखित होता विरह आमुचा
तरीही तो बदलायचा होता
बेरंग होता प्रेमाचा साचा
रंग त्यात भरायचा होता...

शेवटची भेट आमुची
आजही तिथेच होती
थोड्या दिवसाची प्रेमकहाणी
जिथे लिहिण्यात आली होती...

प्रेमाचा गंध तो आज
हवेतुनी नाहीसा झाला होता
जन्माची साथ देणाऱ्या चंद्रानेही
तार्यांचा आज साथ सोडला होता...

प्रेमाचे ते दिवस सारे
आज कोठेतरी हरवले होते
उभे होतो सामोरी आम्ही दोघे
तरीही अंतरावर वाटत होते...

नाही जमणार म्हणुनी
सहज पाठ तिने फिरवली
उभा होता वेडा मी तिच्या प्रतीक्षेत
शेवटची भेट मजसी न कळाली...मजसी न कळाली..
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जिवनात दुःख उरलं नसतं
दुःखचं जर उरलं नसतं
तर सुख कोणाला कळलं असतं....?

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....आणि अशाच वेळी,

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं 
खरं प्रेम एकदाच होतं

ते कधीही विसरता येत नाही

शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही....!!!!!!

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

तुझ्यासाठी काही - माझ्या मनातलं

बस हि शेवटची कविता - "तुझ्यासाठी काही - माझ्या मनातलं"
पोहचल्या माझ्या भावना तर reply कर.......

असं काहीस लिहील होतं मी त्या mail मध्ये
पण तरही reply आलाच नाही

एक मन म्हणाले बस आता
लिहायचेच नाही, शब्दांशीही बोलायचे नाही.....
तुझ्यासाठी लिहिणाऱ्या........
माझ्या त्या शब्दांवरही चिडलो थोडा वेळ.....

पण दुसरे मन म्हणाले, 

"तू नाही पण, तू दिलेल्या आठवणीना शब्दात तर जपता येईल"
तूच तर दिल्यात आता भावना लिहायला,
हा......, कधी पापण्यातही भरून येतात त्या !,
कधी वाहतात अगदी आटेपर्यंत......डोळ्यातून !
अजून काय बोलू वेदना सांगायला आता शब्दच उरले नाही

आलीस online पण, बोलली काहीच नाहीस
दिसल्या माझ्याच कवितेच्या शेवटच्या चार ओळी satus वर
पण तेही मनाला सावरून गेलं,
शब्द तर ठेवलेस माझे मनात जपून, याच समाधान वाटल

पण............

कस ग जमत कोणाला, ज्यावर प्रेम आहे त्याच्याशी अबोला धरायला?
काश.......
मलाही जमल असतं तर....
गरज नसती पडली शब्दांचा अबोला सहन करायला.....!!!!!! 
आज पुन्हा खूप दिवसांनंतर तुझी आठवण आली 

किंतु पूर्वीच्या आठवणींपेक्षा हि जरा होती वेगळी

आधीच्या आठवणीत होतीस तू माझ्या जवळची  

आताच्या आठवणीत राहिलीस तू फक्त एक क्षण दुखाची  

आधीच्या आठवणीत होतीस तू एखाद्या पावसातल्या पहिल्या सरीसारखी  

आताच्या आठवणीत बनली आहेस केवळ अश्रुतल्या थेम्बासारखी 

पूर्वीच्या आठवणीत होतीस तू एक सुखद हळुवार हवेच्या झुलकीसारखी 

किंतु आताच्या आठवणीत राहिलीस तू जखमेवर फुंकर घालणारया वेदनेच्या जाणीवेसारखी 

तू होतीस माझ बालपण 

जे काळाच्या ओघात वाहत जाऊन आता राहिली आहे केवळ एक आठवण.......

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.........

नाती

जीवन वाटेवर अनेक जुळतात नाती
काही कोमेजती,काही फ़ुलतात नाती...
दु:ख देती तसेच सुखावतात नाती
कुणास आयुष्यभर छळतात नाती...

वात्सल्य,प्रेम,मायेत झुलतात नाती
विश्वासाने हळूहळू खुलतात नाती...
कुठे हरवती कुठे मिळतात नाती
क्षणिक स्वार्थापोटी भुलतात नाती...

हातात हात घेऊनी चालतात नाती
सुखात जवळ दु:खात पळतात नाती...
काही पणती सारखी जळतात नाती
कायमची ह्रुदयाला काही सलतात नाती...

मनात जरी रुजतात नाती

प्रेम, मायेने हसतात नाती...
अविश्वास होता थोडासा
एकमेकांवर का रुसतात नाती...?

काही वळणावर हरवतात नाती
स्वार्थापोटी मिरवतात नाती...
आपुलकी कुठे असते हल्ली
माणसे कुठे टिकवतात नाती...?

घास प्रेमाचा भरवतात नाती
धडा नात्यांचा गिरवतात नाती
गैरसमज मनात जागता थोडासा
कायमची का दुरावतात नाती..?

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

घेतलीय भरारी मी.....!

घेतलीय भरारी मी आता 
क्षितीज नवे गवसण्यासाठी
सगळे स्वप्ने चिमण्या डोळ्यामध्ये साठवून
सगळ्या आकांक्षामध्ये नव्याने रंग भरून 

पंखाना जखम झाली म्हणून काय
पक्षी उडण सोडून देतात?
नव्याने पंखात भरून जोम पुन्हा उडू पाहतात.....
असेल अस तर....

ठेच लागली म्हणून 
मी का चालण सोडव?
दुखावलं कोणी मन म्हणून 
भावनांशी नात का तोडाव? 

मलाही वाटतंय आता नव्याने 
शब्दांशी नात जोडावं 
परत एकदा भावनेचे बोट 
धरून काही जिव्हाळ्याच लिहावं
शब्दाने तर जग जिंकता येत ना.... 
मग शब्दांपासून का नाही काही शिकावं?

कारण म्हणतात,
"कुणाचंच कुणावाचून अडत नाही,
मग पाखर का पंखावाचून उडत नाही?" 
तसंच,
शब्दावाचून माणूस घडला,
असंही कधी घडत नाही....!