फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

घेतलीय भरारी मी.....!

घेतलीय भरारी मी आता 
क्षितीज नवे गवसण्यासाठी
सगळे स्वप्ने चिमण्या डोळ्यामध्ये साठवून
सगळ्या आकांक्षामध्ये नव्याने रंग भरून 

पंखाना जखम झाली म्हणून काय
पक्षी उडण सोडून देतात?
नव्याने पंखात भरून जोम पुन्हा उडू पाहतात.....
असेल अस तर....

ठेच लागली म्हणून 
मी का चालण सोडव?
दुखावलं कोणी मन म्हणून 
भावनांशी नात का तोडाव? 

मलाही वाटतंय आता नव्याने 
शब्दांशी नात जोडावं 
परत एकदा भावनेचे बोट 
धरून काही जिव्हाळ्याच लिहावं
शब्दाने तर जग जिंकता येत ना.... 
मग शब्दांपासून का नाही काही शिकावं?

कारण म्हणतात,
"कुणाचंच कुणावाचून अडत नाही,
मग पाखर का पंखावाचून उडत नाही?" 
तसंच,
शब्दावाचून माणूस घडला,
असंही कधी घडत नाही....!

आठवण म्हणजे...


आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?

आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.

आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.

आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.

आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.

आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...

आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.

माझा काय दोष होता

माझा काय दोष होता
प्रत्येकजण मलाच सोडून गेला
मी नेहमी जपल्या सगळ्यांच्या भावना 
प्रत्येकजण माझंच मन मोडून गेला
नव्हत्या काहीच अपेक्षा, 
नाही काही मागणे
फक्त चूक इतकीच आहे
निस्वार्थी पणे देत राहणे
का काही माणस अशी 
जिवलग होऊन जातात
क्षणभरही विचार न करत 
झटकून अर्ध्यात सोडून जातात
भरपूर काही दिल तरी
सगळंच राहून जात रीत 
खरच का............?
अर्धात्वाच्या शापाने शापित असत नात......!

प्रेम मी हि केलं

प्रेम मी हि केलं

सगळे म्हणतात प्रेम कराव, त्यात हरून जावं,
कोणीतरी आपल्याला आपलं म्हणावं,

पण मला आता अस का वाटत
तिच्या पासून दूर निघून जावं....?

मी ही प्रेम केलं मनापासून,
पण ती कधी समजलीच नाही
मग मी तिच्यासाठी स्वतःला का विसरावं...?

तिने मजेत जागाव
आणि मी का वाट पाहत राहावं...?

पण आता मी ठरवलंय,
असं जागाव की, सगळ्यांनी पाहत रहाव ,
आणि हे पाहून तिनेही कधीतरी आपल म्हणाव .

कधी कधी असं का वाटत ,
बस झालं आता मरून जाव...!!