फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २८ जून, २०११

काही चारोळ्या

मन गुंतवायला वेळ लागत नाही..
मन तुटायला वेळ लागत नाही,

वेळ लागतो ते गुंतलेल मन आवरायला..
आणि तुटलेल मन सावरायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



=========================================


जिच्यावर जिवापाड प्रेम केल
तीच आज परक्या सारखी वागते
पण तरीही मी हे सहन करतो
कारण स्वप्नात ति माझ्याशी प्रेमाने वागते.........!!!



=========================================


एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी विश्वास करण्यासाठी. ......
आणि.....,
आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा
...
मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा

शुक्रवार, २४ जून, २०११

Watch this Video & listen wording


आज मला ती अचानक दिसली..


आज मला ती अचानक दिसली..
मनात छोटीशी कळ उठली..

कधीकाळी आपलीशी असणारी..
आज किती परकी वाटली।

ढगाळ आकाश अन् सुसाट वारा..
ओढणी सांभाळत ती फार सुंदर वाटली।

डोळे भरुन तिला पाहण्याऐवजी..
माझ्याच डोळ्यात आसवं दाटली।

क्षणभर वाटलं थांबवावं तिला..
पण पुन्हा मनाला भिती वाटली।

तिच्या अनेक आठवणीँ मध्ये..
आज अजून एक आठवण साठली।

मनापासून सांगतो मित्रांनो,
आज पूर्ण दिवसाची वाट लागली।।

गुरुवार, २३ जून, २०११

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???




आपण जिच्यावर प्रेम करतो |
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो |
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो |

दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते |
कारण ती आपल्या हृदयात असते |

प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते |
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते |

दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो |
स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो |

भास होत आहे हे जेव्हा मला कळते |
तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते |

जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो |
नियतीच्या खेळापुढे मी कसा हरतो |

आपण जिच्यावर प्रेम करतो |
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

मंगळवार, २१ जून, २०११

हम्म... जरा नव्याने... खरच
नव्याने सुरुवात करावी म्हणतोय मी ....
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

ते पावसाचे रीमझीमणे
अन त्यातल्या कातरवेळीच्या आठवणी
पुन्हा एकदा ओठावर येतात
तीच ती विरहाचे गाणी......

रेशमी केसांच्या बटा
ती गालावरची खळी..
छ्या ... नको वाटतात
आता त्या आठवणी...

छळणाऱ्या या आठवणी
घर करून बसतात मनी...
कातरवेळ आली कि....
येतात फिरून माघारी...

शब्दातीत यांचे वर्णन...
करावे म्हणतोय मी...
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

बुधवार, १५ जून, २०११

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका... पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ कधी करू नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...

सोमवार, १३ जून, २०११

ये ना परतुन प्रिये.....

तुला पाहुनच मी जगतो
स्वप्नात तुला मी बघतो
तुझ्यासाठीच जीव तरमळतो
ये ना परतुन प्रिये.....


जीव झाला एकटा
साथ नाही कुणाचा
आवाज तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये....


आठव ते क्षण्
हातात हात घालुन फ़िरलेले
साद तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये.....


माझ्याविना जरी तु
सुखी असली तरी
कसा मी जगतोय पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.....


या वेड्या जीवाला
आस तुझीच आता
श्वास थांबण्याअगोदर
ये ना परतुन प्रिये....


सुरवात आपल्या प्रेमाची
आठवत तुला नसेल तर
शेवट माझा पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.......

प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....



अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ?
सांग पापण्यांना फसवतेस कशाला ?

शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला?
मग चावून अधराना दुखावतेस कशाला?

येता विचार मनी, दडवतेस कशाला?
देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?

गर्दी भावनांची, तू झाकतेस कशाला
भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला

कशा कशाला तू फसवशील, रडवशील, झाकशील
आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना

खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...
प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

एक थेंब तुझ्यासाठी

गुरुवार, ९ जून, २०११


बर झाल प्रेमाच्या बंधनातुन मुक्त केलस,
अस बंधन जे कधी तुटनार नाही वाटत होत,
बर झाल परक मला केलस,
कारण डोळ्यातील अश्रुंचा भाव मज कळला,
आंधळ्या प्रेमाच्या विश्वाचा अर्थ मला वळला,
......वाटत होत आयुष्यात कुणाची साथ हवी
पण अशी साथ दिलीस की कोणाचा विचार देखील मनात येणार नाही,
मीच दु:खी नाहीय,
तुही रडतेस,
आता तुझे अश्रु पुसण्याचा अधिकार मी गमावलोय,
माझ्याच चुकीने मी तुला परका झालोय

बुधवार, ८ जून, २०११


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

खास तिच्यासाठी




तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
तू गेल्यावर एकटा एकटा खूप रडलोय,अजूनही रडतो.
कधी ऑफिस मध्ये जाताना रस्त्यात,कधी ऑफिसमध्ये विचार करताना,
कधी रात्री आठवणी काढताना,कधी एखादे गाणे ऐकून, तर कधी रस्त्या वरची इतर कपल बघून.
एक एक शब्द आठवतो तुझा,आताही लिहिताना डोळ्यात पाणी आहेच......
त्या पाण्याचे वाईट वाटत नाही पण माज्या रडल्याने तुला काहीच फरक पडत नाही ह्या विचारानेच जीव जातोय.
गुदमरतोय जीव माझा.जाऊन कुठे तरी जोरात किंचाळावेसे वाटतंय.
रड रड रडावेसे वाटतंय.सगळे जड जड झालंय.
कधी कधी वाटते कि तू असे केलेस त्यात तुजी काहीच चूक नाही आहे,मीच वाईट असणार.....
पण इतका पण वाईट वागलो नसेन ना मी तुज्याशी?
एकदा पण विचार नाही केलास नाहीस ना माझा????
त्या समुद्र किनार्या वर कधी जाऊ नकोस,
कारण माझ्या पेक्षा तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
....
..
अगं आता नाही करत पण एका क्षणासाठी का होईना कधी तरी प्रेम केले होतेस ना माझ्यावर?
विश्वास उडत चाललाय सगळ्या वरचा
खूप काही बोलायचेय.....
खूप प्रश्न विचारायचेय्त......विचाराय्चेय कि का वागलीस अशी माझ्याशी?
पण माझ्या बोलण्यात आता तुला इंटरेस्ट नसेल आणि
माझ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस तर ती ऐकण्याची माजी हिम्मत नाही आहे
पण
आता
इतका राग नाही राहिलाय
उलट अजून प्रेम वाढलय
असेच वाढू दे अशी इच्छां आहे......
अजून हि खूप प्रेम करतो तुज्यावर
तू नको करूस कधी पण मी करेन नेहमी
....
....
....
जिथे पण जाशील,ज्याच्या बरोबर राहशील खुश रहा.....
दुसरे कोणी नाही तर एक कोणी तरी आहे तुज्यासाठी देवाकडे मागणारा...
कधी तरी खूप रडावेसे वाटेल......
अगदी खुप..
तेव्हा आठवण येईल माझी.....
खुश रहां

गुरुवार, २ जून, २०११

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर


आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही...

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..


डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..


दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही...

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ...

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात  नाही ...

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत  नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ...

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ...

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,
संपण्यासाठीच हे सर्व,
आणि उरण्यासाठी काहीच नाही ....
काहीच नाही ......

बुधवार, १ जून, २०११

सवय अजूनही आहे.....


.

तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची,
सवय अजूनही आहे......

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!
अशीच ऐके दिवशी तू विचार करत बसशील.................,
जवळ कुणीच नसेल तेंव्हा माझीच आठवण काढशील................

पण वेळ निघून गेलेली असेल, 
परतीच्या पाऊल खुणा तू स्वताच पुसून टाकलेल्या असशील........

एकत्र घालवलेला वेळ आठवण्याचा पुन्हा प्रयत्न करशील.............
आठवेलही तुला सर्व काही, 

पण गेलेली वेळ आणि ते क्षण पुन्हा परत कशी आणू शकशील...?