फक्त तुझ्याचसाठी …
- Amit Parthe
- Mumbai, Maharashtra, India
- वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?
बुधवार, १६ जून, २०१०
मंगळवार, १५ जून, २०१०
प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं
हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन
पाऊलवाट शोधणं कठीण असतं
कधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतं
पण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवुन वाटचाल करणं कठीण असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभवुन नेणं मात्र कठीण असतं
प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलुन प्रेम टिकवणं मात्र नक्किच कठीण असतं
म्हणुन सांगतो प्रेमात पडणं
सोप नसतं, सोप नसतं, सोप नसतं ..!
पण प्रेम निभवणं कठीण असतं
हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन
पाऊलवाट शोधणं कठीण असतं
कधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतं
पण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवुन वाटचाल करणं कठीण असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभवुन नेणं मात्र कठीण असतं
प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलुन प्रेम टिकवणं मात्र नक्किच कठीण असतं
म्हणुन सांगतो प्रेमात पडणं
सोप नसतं, सोप नसतं, सोप नसतं ..!
शुक्रवार, ११ जून, २०१०
जीवन कधी असं असतं कधी तसं असतं।
कधी मनसोक्त हसायचं असतं
कधी एकदम शांत राहायचं असतं।
कधी कोणाला हात द्यायचा असतो
कधी अधिकार मिळवायचं असतं।
कधी अथक प्रयत्न करायचं असतं
म्हणून जसं आहे त्याच्याशी न्याय करायचं असतं
आणि समतोल व संयमित जगायचं असतं।
कधी मनसासून राहायचं असतं।
कधी खूप बोलायचं असतं
कधी कोणाला हात मागायचा असतो
कधी कर्तव्य निभवायचं असतं
कधी फक्त बसून गुरुमहाराजाचा जादू पाहायचं असतं।
जीन कधी असं असं कधी तसं असतं।
कारण जीवन जेव्हा असं असतं तेव्हा तसं नसतं
आणि जेव्हा तसं असतं तेव्हा असं नसतं।।
कधी मनसोक्त हसायचं असतं
कधी एकदम शांत राहायचं असतं।
कधी कोणाला हात द्यायचा असतो
कधी अधिकार मिळवायचं असतं।
कधी अथक प्रयत्न करायचं असतं
म्हणून जसं आहे त्याच्याशी न्याय करायचं असतं
आणि समतोल व संयमित जगायचं असतं।
कधी मनसासून राहायचं असतं।
कधी खूप बोलायचं असतं
कधी कोणाला हात मागायचा असतो
कधी कर्तव्य निभवायचं असतं
कधी फक्त बसून गुरुमहाराजाचा जादू पाहायचं असतं।
जीन कधी असं असं कधी तसं असतं।
कारण जीवन जेव्हा असं असतं तेव्हा तसं नसतं
आणि जेव्हा तसं असतं तेव्हा असं नसतं।।
गुरुवार, १० जून, २०१०
प्रेम म्हणजे ................
खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां
होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे
दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे
दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे
दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे
दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे
सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे
तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे
दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे
भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे
एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे
डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे
चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे
प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे …
तू अणि मी, कायम जवळ असणे..!!
खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां
होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे
दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे
दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे
दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे
दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे
सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे
तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे
दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे
भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे
एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे
डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे
चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे
प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे …
तू अणि मी, कायम जवळ असणे..!!
मंगळवार, २५ मे, २०१०
एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव,
पण नंतर वाटल तुझ
तुला कळतय का ते पहाव,
जेव्हा तुझी आस असायची
तेव्हा तूच निराश करायचास,
अन जेव्हा आस मनी नसायची
तेव्हा सुद्धा तूच मनात ज्योत जागवायचास,
मनाच्या समुद्रात उठलेल्या
वादळला तूच प्रवृत्त करायचा,
तर कधी त्याच वादलाला
शांत सुद्धा तू करायचास,
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
साथ तुझी असावी,
दुरावलेल्या माझ्या भावनानी
सांगड़ तुझ्या हृदयाशी घालावी,
कधी हो तर कधी नाही
कधी आपुलकी तर कधी दुरावा,
गोंधळलेल्या मनाचा हात
मी तरी कसा धरावा,
म्हणून एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव…
सांगुन मन मोकळ कराव,
पण नंतर वाटल तुझ
तुला कळतय का ते पहाव,
जेव्हा तुझी आस असायची
तेव्हा तूच निराश करायचास,
अन जेव्हा आस मनी नसायची
तेव्हा सुद्धा तूच मनात ज्योत जागवायचास,
मनाच्या समुद्रात उठलेल्या
वादळला तूच प्रवृत्त करायचा,
तर कधी त्याच वादलाला
शांत सुद्धा तू करायचास,
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
साथ तुझी असावी,
दुरावलेल्या माझ्या भावनानी
सांगड़ तुझ्या हृदयाशी घालावी,
कधी हो तर कधी नाही
कधी आपुलकी तर कधी दुरावा,
गोंधळलेल्या मनाचा हात
मी तरी कसा धरावा,
म्हणून एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव…
तो अन ती दोघेही एकाच वाटेवर चालले होते… एकटेच..
त्याने तिला साद घातली अन म्हणाला , चालशील का या वाटेवर माझ्यासोबत ..
ती म्हणाली का रे ??
ठीक आहे चालते मी तुझ्यासोबत ..चालता चालता त्याने तिची विचारपूस केली,तिनेही कळत – नकळत त्यांची उत्तर ही दिली ,
दोघेही मन मोकलेपणाने गप्पा मारत ते अंतर कापू लागले ….
का कुणास ठावुक ?? दोघांच्याही मनात आतंरिक ओढ़ निर्माण होऊ लागली … याची तिला चाहुल होताच ती गप्प रहू लागली ..तीला गप्प राहण्याचे कारन विचारताच ती काही नाही अस म्हणाली ,
अन अचानक त्याने तिला विचारल ,"आज जशी या वाटेवर तू मला साथ दिली तशीच या जीवनातही देशील का ???"…
त्याच्या या प्रश्नावर तिनेही त्याला प्रश्न विचारला ,"या वाटेवर तू मला किती दिवस साथ देशील ??"
हा प्रश्न जणू काही तिच्या मनानेच विचारला होता …त्याच उत्तर काय असाव ??
त्याने उत्तर दिल ,"शेवटच्या श्वासपर्यंत "'…. अन तिने अपेक्षित न केलेले उत्तर तिला मिळल होत..
ती म्हणाली मी ही तुला या जीवनात साथ देइन….
आणि मग काय ,,,,
त्यानी या वाटेवर चालायला सुरुवात तर केली,
पण ….. पण …..
दोन पावल चालताच त्याचा हात सुटला.. अन तो काही न बोलताच गायब झाला ….
पण अजुन ही ती तिथेच उभी आहे, त्याच्या त्या एक शब्दावर अन त्या वाटेवर… त्याची वाट बघत…येइन तो कधीतरी…पण कधी ??? हेच माहित नाही...
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,
वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,
वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,
वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ...
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,
वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,
वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,
वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ...
तू सोडून गेल्यावर...
तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....
प्रेम करावे पण जरा जपून.........
प्रेम करावे पण जरा जपून,,,,
असे सल्ले देणारे खूप भेटतात...
प्रेमात हि अगदी आधी तेच पडतात....
प्रेमात पडल्यावर स्वतःही पेक्षा जास्त,,,,
प्रेमाला जपावं लागतं,,,,
खरं तर स्वतःचा विचार करायला,,,
भानच कोणाला असतं...
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
इंद्र धनु सारखं रंगत...
आकाश हि कधी कधी,,,
गुलाबी भासायला लागतं..
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
जसं बहरूनच जातं...
काट्यातून चालतानाही,,,
फुलांनी स्पर्शल्या गत वाटतं...
अन् अचानक हे,,,
प्रेमच हरवलं तर,,,
सगळंच हरवून जातं...
श्वास चालू असतात हि,,,
पण जगणंच थांबून राहतं..
म्हणूनच म्हणतात,,,
प्रेम करावे तर जपूनच..
विश्वास ठेवावा तो डोळे उघडूनच....
असे सल्ले देणारे खूप भेटतात...
प्रेमात हि अगदी आधी तेच पडतात....
प्रेमात पडल्यावर स्वतःही पेक्षा जास्त,,,,
प्रेमाला जपावं लागतं,,,,
खरं तर स्वतःचा विचार करायला,,,
भानच कोणाला असतं...
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
इंद्र धनु सारखं रंगत...
आकाश हि कधी कधी,,,
गुलाबी भासायला लागतं..
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
जसं बहरूनच जातं...
काट्यातून चालतानाही,,,
फुलांनी स्पर्शल्या गत वाटतं...
अन् अचानक हे,,,
प्रेमच हरवलं तर,,,
सगळंच हरवून जातं...
श्वास चालू असतात हि,,,
पण जगणंच थांबून राहतं..
म्हणूनच म्हणतात,,,
प्रेम करावे तर जपूनच..
विश्वास ठेवावा तो डोळे उघडूनच....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

