फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

आठवणी

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .......

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

तुझ अस वागण...

कळून चुकल तुझ्या मनातील सर्व काही,
कळून चुकल तुला माझी काळजीच नाही ,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही,
पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,
पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,
तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही,
का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही?

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

श्वासात श्वास गुंतत गेला आणि भावना झिंगत गेल्या
तुझ्या माझ्या प्रेमाच्या रासलीला रंगत गेल्या


तेव्हा फक्त स्पर्शाची भाषा आणि नजरेची बोली होती
माझ्या मनात सजलेली तुझ्या  स्वप्नांची खोली होती
हळूहळू जगाचा विसर पडला सगळ काही माग सोडलं
पण दोघांच्या नात्यात त्याने विघ्न आणलं
आपल्यात येऊन तो कधी उभा
ठाकला मी ही नाही जाणल.......


त्याच्यासाठी तुही माझा हात सोडलास,
कण-कण प्रेमाचा जोडून बांधलेला,
भावनांचा गाव मोडलास....

असा तो तिसरा नेहमीच दोन मनांच्या मध्ये येतो 
आणि क्षणार्धात स्वप्नांचा संसार चूर करून जातो ..

पण तुला तेव्हा कळाले नाही...
कोण आपला आणि कोण परका...

तरीही तू माझा विचार न करताच निर्णय घेतलास... 
आणि आपल्या प्रेमाचा शेवट केलास.......

आसवे

सांग ना, कोठून येती आसवे !
पापण्यांना भार झाली आसवे

हास तू, कोणीतरी हे बोलता
मुक्त वाहू लागली ही आसवे

त्रास होता बंद डोळे उघडती ,
वाहुनी घावास नेती आसवे

शुष्क या डोळ्यांवरी जाऊ नका
वाहती त्यातून माझी आसवे

ओठ दमले गप्प झाले शेवटी
नेमकी कामास आली आसवे

ठेवता विश्वास हो कोणावरी ?
आपली नसतात काही आसवे

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
कारण त्याला शोधणा-या
तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

तुमच काय, माझ काय..........

प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तोच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तिचीच आठवण येणार

तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

डोळ्यात तिच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
दुसरीचा चेहरा सुद्धा मग;
तिच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्त्रांसमोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तिचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तिच्या inbox आपला भरुन जाणार्,
तिचा साधा message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक message पहिला तिलाच forward होणार,
तुमच काय, माझ काय...........
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

येशील ना तेव्हा तुही......... राख माझी वेचण्यासाठी

ये......पुन्हा एकदा
माझ्या कवितांना विषय देण्यासाठी
ये......पुन्हा एकदा
माझ्या जगण्याला आशय देण्यासाठी

मिलनाची स्वप्नं बघतो मी
तुजविन तुकड्यांत जगतो मी
ये...मला एकसंध करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठी

उत्तरे न ज्यांची मजकडे
मन प्रश्न असे विचारू लागले
भावना घुसमटून गेल्या
शब्द आत गुदमरू लागले
ये...मला आझाद करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठी

कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं

जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी

राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
 
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
 
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण .............!!!!!!!!!