आजही भावना आहेत जपलेल्या
पण आता काही लिहू वाटत नाही
तुझ्या विरहात सुगंधी पानांना
आसवांच्या शाईने भिजवू वाटत नाही
तुझ्याच कणा-कणांनी रचलेल
सगळ अस्तित्व माझं पण....
पण आता त्यात स्वताला शोधण्याचा
वेड्या मनाचा अटहास नाही
भेटीची अधीर आता ती ओढ नाही
झुरणारा विरक्त तो श्वासही नाही
सरली सर्व युगे......
जी भरली होती तुझ्या स्पर्शाने
तरीही तू अजून तिथेच राहतेस
खोल कुठेतरी मनाच्या तळाशी
मंद मंद श्वासामध्ये बहरत जातेस
पावसाच्या सरीसवे चिंब भिजवतेस
कोणी म्हणत वेडेपणा याला
कोणी म्हणे मनाचा खेळ आहे
पण केल्याशिवाय कस कळेल कोणाला
प्रेम स्वताच्या अस्तित्वच्या पलीकडे आहे
कारण,
काही क्षण जगलेले स्पर्श हळवे शेवटपर्यंत सोबत राहतात
आणि कधी-कधी काही आठवणी आयुष्य बनून जातात.....
पण आता काही लिहू वाटत नाही
तुझ्या विरहात सुगंधी पानांना
आसवांच्या शाईने भिजवू वाटत नाही
तुझ्याच कणा-कणांनी रचलेल
सगळ अस्तित्व माझं पण....
पण आता त्यात स्वताला शोधण्याचा
वेड्या मनाचा अटहास नाही
भेटीची अधीर आता ती ओढ नाही
झुरणारा विरक्त तो श्वासही नाही
सरली सर्व युगे......
जी भरली होती तुझ्या स्पर्शाने
तरीही तू अजून तिथेच राहतेस
खोल कुठेतरी मनाच्या तळाशी
मंद मंद श्वासामध्ये बहरत जातेस
पावसाच्या सरीसवे चिंब भिजवतेस
कोणी म्हणत वेडेपणा याला
कोणी म्हणे मनाचा खेळ आहे
पण केल्याशिवाय कस कळेल कोणाला
प्रेम स्वताच्या अस्तित्वच्या पलीकडे आहे
कारण,
काही क्षण जगलेले स्पर्श हळवे शेवटपर्यंत सोबत राहतात
आणि कधी-कधी काही आठवणी आयुष्य बनून जातात.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा