फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील 
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

खरच

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???

आई ने विचारले

काल बोलता बोलता अचानक तुझा विषय निघाला
आई ने विचारले "आता काय करते रे ती ??"
नकळत पणे पापणी ओली झाली
इकडे तिकडे बघून पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हि झाला
"नाही माहित" म्हणून वेळ मारून नेली
सांगू तरी काय तिला ?
सोबतचे क्षण ? केलेल्या आणाभाका ? दिलेल्या शपथा?
कि तुझ्या लग्नातील शेवटची भेट ?

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

गरज आहे आज मला
तुझ्या त्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या त्या तुझ्या हातांची..

गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितिची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची..
सारे जग असुरक्षीत वाटताच
तु जवळ आहेस या जाणीवेची
खरच गरज आहे रे आजहि मला....
तुझी....

माझ्या जीवनात अजुन
तुझी कमी वाटते.... :(

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही..........

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस 

माझ्या मनाच्या अंगणात रिमझिमणार नाही......

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११


माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता..

तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ…

चंद्राचे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..

मला सोडून जातेस,
खुशाल निघून जा,
पण जाण्या अगोदर…
माझ्या मनावर कोरलेले तुझे नाव पुसून जा….

जीवनाच्या अनोळखी वाटेवर,
तू मला भेटलिस,
लाडीक हसून,
माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

कालच माझी अंत्ययात्रा निघाली...

मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..
वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..
उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...
तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..
एक दिवस हिम्मत करून विचारले..
तिने माझ्या प्रेमाला नाकारले..
माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...
अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..
कालच माझी अंत्ययात्रा निघाली...
ती कुठेच दिसत नव्हती...
म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..
मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..
जाता जाता मला ती बघायला भेटेल...
तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..
माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...
सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..
तीला तिची चुक उमगली होती..
म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती.........

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे

आता मलाच भीती वाटू लागली माझी
सरू लागली दूर सावली तुझ्या आठवणीची

मन खंतावते, कोसते का झुरावे तुझ्यासाठी
ना आहे मनात आठवण... ना तुला गरज माझी
रमलीस तू वेगळ्या विश्वात विसरुनी पाऊलखुणा
मीच रेंगाळत राहिलो इथेच सोशीत विरह यातना
आज पहिले तुला... होती नजर अनोळखी अशी
भेटलेच नव्हतो कधी जन्मात होते कुणी परकी
नाहीस आता माझी तू कळतच नाही कळूनही
डोळ्यात पाणी उभे.. वेदना मनीची सरत नाही
आता या वळणावर मजला दूर व्हायला हवे
विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे...

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?

नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?


चुक झाली माझी
चुक झाली माझी की मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्तानको ढाळुस अश्रु आत्ताऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...

बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पंआज रहाशील गप्पंतुझ्या कडे ऊत्तर नसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

नाव यमा कड़े बुक केलय





तिच्या विरहात जगन आता
खुप मुश्किल झालय
म्हनुनच माझ नाव
यम देवाकड बुक केलय
नाही उरली जगण्याची इच्छा
मला आता दूर जायचय
या खोट्या दुनियेत
मला अजिबात नाही रहायच
अहो आज पर्यन्त ती
खुप प्रेम करत आली
अचानकच मला फसउन
दुसय्रा बरोबर गेली
"तू माझ्याशी लग्न नाही केलस तर
मी जिवच देंइन" अस सारख बोलायची
म्हनुनच मला सवय झाली
प्रतेक स्थळ नाकारायची
घरचे सगले रागवायचे
गावातले लोक नाव ठेवायचे
पापा आणि आई रोज
टेंशन मधेच असायचे
माझ्या बरोबरच्या मुलांची मूल
शाळेत जाऊ लागली
आणि आमची लग्न पत्रिका अजुन कोनाशिच
न्हवती जुळली
आता नाही करायच लग्न मला
ना आता जगायचय
या धोकेबाज लोकांपासून
मला दूर निघून जायचय
खरच तुझ्या विरहात माझ जगन मुश्किल झालय
आणि जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय
जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय


सोमवार, १ ऑगस्ट, २०११

कधीच न्हवत वाटल मला
























कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडल
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडल
नेहमी मला म्हणायची ती
डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलान्नी
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
भाराउन च गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती

स्वप्न






























तुझी साथ हवी होती मला आयुष्यात
खूप स्वप्न पहिली त्यासाठी
पण डोळे उघडले आणि स्वप्ने तुटली
नेहमी असेच का होते
स्वप्न हे स्वप्नच बनून का राहते

स्वप्नांना सत्याची जोड का नसते
जे काही असते ते सगळे खोटे असते
कारण स्वप्न हे स्वप्न असते
त्यात काही सत्य नसते

प्रेम माझे खरे होते तुझ्यावर
पण नाही सांगू शकलो कधी तुला
कारण तेव्हा मी स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्याबरोबर रमत होतो

आज त्या गोष्टीला खूप उशीर झाला आहे
हातातून सगळ्या गोष्टी निसटून गेल्या आहेत
तरीही मी अजून स्वप्नांच्याच दुनियेत आहे
कारण जे सुख सत्यात नाही
ते स्वप्नात आहे

आज खुप रडाव वाटतय


 
माहिती नाही का ??
पण आज खुप रडाव वाटतय...


आईच्या कुशीत जावून झोपाव वाटतय
धावपळीच्या जीवनात , सुटली अनामोल नाती मागे
माहिती नाही का??
आज ती सगळी नाती पुन्हा एकदा जोडावी वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


केंव्हातरी ह्या गर्दी मध्ये गवसल होत कोणी माझ
माहिती नाही का??
आज त्याला परत शोधून आणाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


रोज स्वप्नातच जगते मी
माहिती नाही का??
आज त्या स्वप्नाना दूर सारून वास्तवात याव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


रोज स्वता:शी खोट बोलते मी
माहिती नाही का??
आज स्वत:ला सगळ खर सांगव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


माहिती नाही का??
तुटलेल सार पुन्हा परत जोडाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय.......
माहिती नाही का??
पण खुप खुप रडाव वाटतय !!!!!!!

बुधवार, २७ जुलै, २०११

मी होतो आयुष्यात तरी वाट तुला नव्या प्रेमाची होती ..
मी तुटलो संपलो प्रेमात तरी अपेक्षा तुझी वेगळीच होती ...
जगापासून लपवत आपले नाते हे फुल माझे आता फुलपाखरू नाव शोधू लागल ...
माझ्याच गैरसमजुतीचा परिणाम आहे जे कि मी प्रेम समजलो आणि माझे फुल दुसर्याच कधीच होऊन गेल ...

शुक्रवार, २२ जुलै, २०११

"माझे श्वास मिटण्याआधी
एकदा येऊन भेटून जा
गळून पडलेल शरीर माझ
एकदा अंगाशी लपेटून जा....
माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
एकदा येऊन समेटून जा
श्वास माझे मिटण्याआधी
फ़क्त एकदा येऊन भेटून जा"

मंगळवार, १९ जुलै, २०११

म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही ! . .


मुखवट्यांच्या पसा-यात....मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

आतून - आतून येतात कढ
रडावसं वाटत नाही...
विनोदावर कुठल्याही
साधं हसू फ़ुटत नाही....

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

येते सर जाते सर
चिंब मन भिजत नाही...
येतो वारा घालतो घाला
रक्त काही सळसळत नाही...

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

शुक्रवार, १ जुलै, २०११


खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार
...
विरह हा नाही सहन होत
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार
कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

काळजवारची जखम अजून ओलीच आहे
कारण तू तिला सुकायच वाव दिला नाहीस
एक दुख संपण्याआधी प्रतेक वेळेला
दुसरा घाव दिला आहेस...
...पण असुदे,
तू नसण्याच्या दुखापेक्षा
तू दिलेल्या जखमा तर माझ्या आहेत
तू माझी नसण्यापेक्षा तू माझीच असल्याच्या
आठवणी तर अस्तित्वात आहेत

तुला माझी आठवण येते ?


अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना
......एकदा तरी माझी आठवण काढ.......

मंगळवार, २८ जून, २०११

काही चारोळ्या

मन गुंतवायला वेळ लागत नाही..
मन तुटायला वेळ लागत नाही,

वेळ लागतो ते गुंतलेल मन आवरायला..
आणि तुटलेल मन सावरायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



=========================================


जिच्यावर जिवापाड प्रेम केल
तीच आज परक्या सारखी वागते
पण तरीही मी हे सहन करतो
कारण स्वप्नात ति माझ्याशी प्रेमाने वागते.........!!!



=========================================


एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी विश्वास करण्यासाठी. ......
आणि.....,
आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा
...
मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा

शुक्रवार, २४ जून, २०११

Watch this Video & listen wording


आज मला ती अचानक दिसली..


आज मला ती अचानक दिसली..
मनात छोटीशी कळ उठली..

कधीकाळी आपलीशी असणारी..
आज किती परकी वाटली।

ढगाळ आकाश अन् सुसाट वारा..
ओढणी सांभाळत ती फार सुंदर वाटली।

डोळे भरुन तिला पाहण्याऐवजी..
माझ्याच डोळ्यात आसवं दाटली।

क्षणभर वाटलं थांबवावं तिला..
पण पुन्हा मनाला भिती वाटली।

तिच्या अनेक आठवणीँ मध्ये..
आज अजून एक आठवण साठली।

मनापासून सांगतो मित्रांनो,
आज पूर्ण दिवसाची वाट लागली।।

गुरुवार, २३ जून, २०११

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???




आपण जिच्यावर प्रेम करतो |
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो |
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो |

दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते |
कारण ती आपल्या हृदयात असते |

प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते |
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते |

दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो |
स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो |

भास होत आहे हे जेव्हा मला कळते |
तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते |

जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो |
नियतीच्या खेळापुढे मी कसा हरतो |

आपण जिच्यावर प्रेम करतो |
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

मंगळवार, २१ जून, २०११

हम्म... जरा नव्याने... खरच
नव्याने सुरुवात करावी म्हणतोय मी ....
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

ते पावसाचे रीमझीमणे
अन त्यातल्या कातरवेळीच्या आठवणी
पुन्हा एकदा ओठावर येतात
तीच ती विरहाचे गाणी......

रेशमी केसांच्या बटा
ती गालावरची खळी..
छ्या ... नको वाटतात
आता त्या आठवणी...

छळणाऱ्या या आठवणी
घर करून बसतात मनी...
कातरवेळ आली कि....
येतात फिरून माघारी...

शब्दातीत यांचे वर्णन...
करावे म्हणतोय मी...
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

बुधवार, १५ जून, २०११

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका... पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ कधी करू नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...

सोमवार, १३ जून, २०११

ये ना परतुन प्रिये.....

तुला पाहुनच मी जगतो
स्वप्नात तुला मी बघतो
तुझ्यासाठीच जीव तरमळतो
ये ना परतुन प्रिये.....


जीव झाला एकटा
साथ नाही कुणाचा
आवाज तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये....


आठव ते क्षण्
हातात हात घालुन फ़िरलेले
साद तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये.....


माझ्याविना जरी तु
सुखी असली तरी
कसा मी जगतोय पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.....


या वेड्या जीवाला
आस तुझीच आता
श्वास थांबण्याअगोदर
ये ना परतुन प्रिये....


सुरवात आपल्या प्रेमाची
आठवत तुला नसेल तर
शेवट माझा पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.......

प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....



अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ?
सांग पापण्यांना फसवतेस कशाला ?

शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला?
मग चावून अधराना दुखावतेस कशाला?

येता विचार मनी, दडवतेस कशाला?
देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?

गर्दी भावनांची, तू झाकतेस कशाला
भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला

कशा कशाला तू फसवशील, रडवशील, झाकशील
आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना

खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...
प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

एक थेंब तुझ्यासाठी

गुरुवार, ९ जून, २०११


बर झाल प्रेमाच्या बंधनातुन मुक्त केलस,
अस बंधन जे कधी तुटनार नाही वाटत होत,
बर झाल परक मला केलस,
कारण डोळ्यातील अश्रुंचा भाव मज कळला,
आंधळ्या प्रेमाच्या विश्वाचा अर्थ मला वळला,
......वाटत होत आयुष्यात कुणाची साथ हवी
पण अशी साथ दिलीस की कोणाचा विचार देखील मनात येणार नाही,
मीच दु:खी नाहीय,
तुही रडतेस,
आता तुझे अश्रु पुसण्याचा अधिकार मी गमावलोय,
माझ्याच चुकीने मी तुला परका झालोय

बुधवार, ८ जून, २०११


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

खास तिच्यासाठी




तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
तू गेल्यावर एकटा एकटा खूप रडलोय,अजूनही रडतो.
कधी ऑफिस मध्ये जाताना रस्त्यात,कधी ऑफिसमध्ये विचार करताना,
कधी रात्री आठवणी काढताना,कधी एखादे गाणे ऐकून, तर कधी रस्त्या वरची इतर कपल बघून.
एक एक शब्द आठवतो तुझा,आताही लिहिताना डोळ्यात पाणी आहेच......
त्या पाण्याचे वाईट वाटत नाही पण माज्या रडल्याने तुला काहीच फरक पडत नाही ह्या विचारानेच जीव जातोय.
गुदमरतोय जीव माझा.जाऊन कुठे तरी जोरात किंचाळावेसे वाटतंय.
रड रड रडावेसे वाटतंय.सगळे जड जड झालंय.
कधी कधी वाटते कि तू असे केलेस त्यात तुजी काहीच चूक नाही आहे,मीच वाईट असणार.....
पण इतका पण वाईट वागलो नसेन ना मी तुज्याशी?
एकदा पण विचार नाही केलास नाहीस ना माझा????
त्या समुद्र किनार्या वर कधी जाऊ नकोस,
कारण माझ्या पेक्षा तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
....
..
अगं आता नाही करत पण एका क्षणासाठी का होईना कधी तरी प्रेम केले होतेस ना माझ्यावर?
विश्वास उडत चाललाय सगळ्या वरचा
खूप काही बोलायचेय.....
खूप प्रश्न विचारायचेय्त......विचाराय्चेय कि का वागलीस अशी माझ्याशी?
पण माझ्या बोलण्यात आता तुला इंटरेस्ट नसेल आणि
माझ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस तर ती ऐकण्याची माजी हिम्मत नाही आहे
पण
आता
इतका राग नाही राहिलाय
उलट अजून प्रेम वाढलय
असेच वाढू दे अशी इच्छां आहे......
अजून हि खूप प्रेम करतो तुज्यावर
तू नको करूस कधी पण मी करेन नेहमी
....
....
....
जिथे पण जाशील,ज्याच्या बरोबर राहशील खुश रहा.....
दुसरे कोणी नाही तर एक कोणी तरी आहे तुज्यासाठी देवाकडे मागणारा...
कधी तरी खूप रडावेसे वाटेल......
अगदी खुप..
तेव्हा आठवण येईल माझी.....
खुश रहां

गुरुवार, २ जून, २०११

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर


आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही...

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..


डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..


दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही...

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ...

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात  नाही ...

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत  नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ...

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ...

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,
संपण्यासाठीच हे सर्व,
आणि उरण्यासाठी काहीच नाही ....
काहीच नाही ......