फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

माझ्या शितल साठी माझी शेवटची कविता......

सारं आठवतय.......
आपल्या नेहमीच्या बाकावर बसणं
तिथे खांद्यवर डोकं ठेवून एकमेकांत रमून जाणं
"देशील ना मला साथ म्हणून" 
माझ नेहमीचं विचारणं...
तुझे ही मला हसत हसत उत्तर देण..
नाही जाणार सोन्या तुला कधी सोडून...
सारं आठवतय..........

असच सगळं अलबेल चालू असताना..
एकेदिवशी तुझा मला फोन येन,
आणि मला बोलणं, माझा विषय दे सोडून,
नंतर मी तुला शेवटच भेटायला बोलावणं
तुझ ते वागण पाहून सगळं मला समजणं
तरीही मी तुला विचारणं
त्यावर जा मला विसरून असं म्हणून
तुझं ताडकन निघून जाणं
सारं आठवतय.........

तू जात असताना 
तुझा हात रिक्षात मी घट्ट पकडून ठेवण 
माझं तुला डोळे भरून पाहणं
त्या मध्येही डोळ्यात पाणी येणं
तुझं साधं मागे वळूनही न पाहणं
सारं आठवतय
सारं आठवतय................ 

त्याच आठवणी घेऊन मला आता संपूर्ण आयुष्य काढायचंय,
तुझ्या आठवणीत आता मला माझ्या सोबत ठेऊन जगायचं.......

तू तर जीव घेऊन निघून गेलीस...
तरीही आज जीव जळतोय.....
तू परत येण्याची आस आजूनही मनात आहे,
म्हणूनच मी आता जगतोय....

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०१०

ती म्हणायची.........



डोळ्यांत तुझ्या पाहिलं की......
आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी.......
आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!

गालावरची खळी पाहिली की......
हसू थांबावच वाटत नाही.......
खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की.......
तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर......
माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!

तुझी आठवण येणार नाही.......
असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.......
स्वप्न तूटावसच वाटत नाही......

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

प्रेम म्हणजे ( तुझ्यासाठी )

प्रेम म्हणजे रोज रोज एकमेकांना बघणे नव्हे,
प्रेम म्हणजे रोज रोज एकमेकांशी बोलणे नव्हे...

प्रेम म्हणजे एकमेकांपासून दूर राहून एकमेकांच्या आठवणीत दिवस काढणे...

असं प्रेम करावं


थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अगं" चा "अरे" करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

मी संपतो आहे


आज जीवनाच्या एका वळणावर मी उभा आहे
मागे वळता पाहतो तर मी एकटाच आहे

जरा मन बिथरले,कावरे बावरे झाले
माझ्या नजरांना केवळ तीचेच वेध लागले

पण ती शेवटी मला दिसली,ती तीच होती
पण एक गोष्ट मात्र कळली की तिची वाट मात्र आता वेगळी होती

माझ्या डोळ्यांत अश्रू तरारले,
पण तिचे अश्रू ही माझ्या मनात घर करून गेले

मी माझ्या आसवांना आसरा देऊ शकलो
पण तिच्या अश्रूंना नाही पुसू शकलो

मनात आले धावत जावे,तिला मिठीत घ्यावे
आणि तिच्या प्रत्येक अश्रूला हृदयात साठ्वावे

पण मला कळले की मी हाताश् आहे
आणि तिचे जग आता किती वेगळे आहे

तिचे जग वेगळे आहे
कारण ती तुमच्या सारखी सामान्य आहे
आणि मी हे म्हणतोय
कारण मजला आज मृत्यूने वेढले आहे

मी आता तुमच्यात नसणार आहे
पण माझे अस्तित्व तुमच्यात कायमचे राहणार आहे

कारण मी तिच्या हृदयात असणार आहे
तिच्या प्रत्येक आसवांत हसणार आहे

आणि शेवटी ह्या वाटे वर मी एकटाच आहे
तरीही त्यामध्ये एक आगळा आनंद आहे
कारण "मी संपतो आहे"

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

प्रेमात कधी पडू नकोस..


ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

पहिले प्रेम.......


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.


जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला 
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स