फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

रंग बदलेस म्हणून

उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे

उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

“सणाला तरी हसत जा” तु अस म्हणशील”
बाहेरच जग पाहत जा” तु असही म्हणशील
“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा” तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही


आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही
चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही
सगळयान्बरोबर असताना हसून दुःख लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती
मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी जानवलीच नाही
ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत नव्हती ?
याचे उत्तर एकच समजले मला,
मी आपली मैत्रिण समजत होतो जिला
तिने मला आपला मित्र कधी मानलेच नाही...
आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही....
आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...

एवढे एक करशील ना ?


शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

तुला काय वाटल...................


तुला काय वाटल,
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो......
आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

काही आठवणी विसरता येत नाहीत


काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

तरीही का कोणास ठाऊक असं वाटतं..

कळतं कुठूनतरी तू होतीस जवळ कुणाच्यातरी 
अलगद तुझा स्पर्श झाला कुणालातरी 
असेल त्याच्यासठी कदाचित तो प्राजक्त 
पण,माझ्यासठी जळणारा कोळसा फक्त 

असो,नशिबातच नसशील तू माझ्या कदाचित 
चंद्र आणि एखादी चांदणी जवळ असल्याचे 
आभास होत राहतात पृथ्वीवरून 
मात्र, प्रत्यक्षात असतं काही कोटी मैलांचं अंतर 

दुःख एवढच बोचतं की,
असे आभासही नाहीत आता आपल्यात 
आणि मनामनातली अंतरंतर मोजमापनाच्या पलीकडची !!! 

तरीही का कोणास ठाऊक असं वाटतं...

थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

मनात झालि गर्दी जेव्हां आठवणींची
कातरवेळी रिमझिम होती कैक क्षणांची
त्यातील काही हळवे अंगण भिजवून गेले
आणि, उरले सुरले नुसते वाहून गेले
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

आठवते मग भिजलेली ती नाजुक वेळ
हातामधे हात गुंफण्याचा तो खेळ
किती सरी मग रिमझिम करुनी जातात
कुणास ठाऊक, किती अंगभर रहातात
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

आठवण...... न संपणारा प्रवास

तिची आठवण
एक न संपणारा भास.

तिची आठवण
एक दोघांचा विश्वास.

तिची आठवण
एक जगण्याचा श्वास.

तिची आठवण
एक स्मृतिलाच ध्यास.

तिची आठवण
एक ह्र्दयातला वास.

तिची आठवण
एक आठवणीची आरास.

तिची आठवण
एक अश्रुची भड़ास.

आठवण.......... ?

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

कारण..........

तिच्या सोबतचे क्षण न क्षण
सोडत नाहीत आठवणी.

आज मात्र क्षण न क्षण
टोचत राहातात आठवणी.

वेळेच भान न ठेवता 
भिडस्तपणे येतात तिच्या आठवणी.

मग, मीही भीडभाड न ठेवता 
घुसतो तिच्या आठवणीत.

मोरपंखा सारख्या अलगद
येतात तिच्या आठवणी.

मग, दिवसभर मला,
ओरबाडत राहातात तिच्या आठवणी.

म्हणुनच..........

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

पण.....

तिची आठवण एवढी कोरल्या गेलीय,
काय ठरवले तेच आता आठवत नाही.